
अभिषेक मंत्र
कित्येक दिप विझले जरी या जगांत ।
तळपे कधी न विझता रवी या नभांत ।।
निर्मु असंख्य हृदयी शिवसूर्यज्वाला ।
सर्वस्व देतील स्वयें क्षणी मायभूला ।।१।।
माघार ठावी न कधी आम्ही मातृभक्त ।
राष्ट्रार्थ जीवन जगुं शतधा विरक्त ।।
चित्तांत साठवू सदा शिवभूपतीस ।
काळास जिंकिल असा घडवू स्वदेश ।।२।।
रक्तांत बिंबवू उठा अरिसूडत्वेष ।
त्या वाचुनी न टिकतो कधी हि स्वदेश ।।
जाळु गलिच्छ क्लिबवत अवघे विटाळ ।
राष्ट्रात निर्मु अवघ्या शिवसूर्यजाळ ।।३।।
इतिहास गर्जुनी आम्हा कटू सत्य सांगे ।
ठेचु शकला यवना जरी व्हाल जागे ।।
संपूर्ण नाश अरीचा जरि ना कराल ।
विश्वात राष्ट्र म्हणुनी कधी ना टिकाल ।।४।।
शिवबा कशास्तव कसें जगले स्मरुया ।
शिवभूपमार्ग विजयार्थ उठा धरु या ।।
मनिषा अपूर्ण परिपूर्ण करावयास ।
विजयी रणात करु या भगव्या ध्वजास ।।५।।
राष्ट्रार्थ जीवन जगुं प्रण हा अभंग ।
आपत्ती दुःख भवती असता अथांग ।।
सर्वस्व अपर्ण करू आम्ही मायभूस ।
निर्माल्य जीवन बनो उरी तीव्र ध्यास ।।६।।
आकाशी सूर्य म्हणुनी ऋतुचक्र चाले ।
पाण्यामुळे जगतीं मत्स्य जिवंत ठेले ।।
देहात प्राण म्हणुनी आम्ही जीवमान ।
शिवसूर्य चित्ती धरूनी बनू राष्ट्रवान ।।७।।
राष्ट्रार्थ हाती धरणे ''शिवखड्गधारा" ।
पाळे मुळे समुळही जाळूनी शत्रू मारा ।।
वधण्या अभंग धृतीने रणीं म्लेंच्छदैत्य ।
सिंहासमान जगलें शिवसूर्य नित्य ।।८।।
भगवा करांत धरिला कधींही न सोडू ।
हिन्दुत्वशत्रु सगळे हुडकुनी गाडू ।।
शिवसूर्य ध्येय आमुच्या नित काळजात ।
रणकंदणी फडकवू भगवा जगांत ।।९।।
दीपात तेल नसता न पडे प्रकाश ।
निष्ठा विना न तगडां बनतो स्वदेश ।।
हिन्दुसमाज मतीं हृद करण्या स्वतंत्र ।
शिवबा विना न दुसरा बलशाली मंत्र ।।१०।।
हिन्दूत चेतवू उठा शिवसूर्यजाळ ।
जो जाळ जाळील पूरे अरिम्लेंच्छकुळ ।।
ह्या लक्षपूर्ती स्तवही जगणे जयांचे ।
हे राष्ट्र निर्मु असल्या "शिवशार्दुलांचे" ।।११।।
संभाजीमंत्र तदवत् उरी ज्या शिवाजी ।
मारेल मृत्यूवरही रणीं नित्य बाजी ।।
हे हिन्दुराष्ट्र करण्या रवीवत् ज्वलंत ।
हे बीज मंत्र भिनवू मनशोणितात ।।१२।।
निष्ठा अभंग उरी ठेऊनी मार्ग चाला ।
आव्हान देऊनी उठा नित संकटाला ।।
आशिष देईल तुम्हा तुळजाभवानी ।
जिंका आदेश दिधला शिवभूपतींनी ।।१३।।
देहास मानूनी जगा नित पायपोस ।
झुंजा अखंड करण्या आपुला स्वदेश ।।
होऊ नका चूकूर हो हृद्गत कथूनी ।
संदेश अंतिम दिला शिवभूपतींनी ।।१४।।
कशासाठी आणि जगावें कसे मी ।
विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी ।।
जगू पांग फेडावया मायभूचे ।
आम्ही मार्ग चालू जिजाऊसुताचे ।।१५।।