
तमाला गिळोनि जगां उजळावें
किती भोवती दाट अंधार ठेला ।
कसें संपवावे आतां या तमाल ? ।।
असे ज्योतीनें ना कधीही म्हणावे ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।१।।
जरी वादळे येतील विझवाया ।
अति कंप पावली इवलीशी काया ।।
तरी हि निरंतर तू तेवत जाळावें ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।२।।
अपेक्षा करावी न तू सोबतीची ।
तुझी नाळ आहे रवीच्या कुळीची ।।
स्वयंभू स्वयंदिप्त तू कां भीआवे ? ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।३।।
युगे आली आणि किती एक गेली ।
रवी जान्हवी ना विचलित झाली ।।
द्वयांना निरंतर तू चित्ती स्मरावें ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।४।।
तुझे अंधाराशी उभे हाडवैर ।
निरंतर तू करिसी तमावर प्रहार ।।
तूं कर्मयोगी कधी ना थकावे ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।५।।
तमाशी कधीचे तुझे द्वंद्वयुद्ध ।
विनाथांब लढण्यात तूं जगप्रसिद्ध ।।
वीराग्रणीचे जिणे त्वां जगावे ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।६।।
चळेना ढळेना कधीही थकेना ।
नभी भानू जो तो कधीही विझेना ।।
जळावे कसे ते रवीला पुसावें ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।७।।
नद्या या जलाला फुले सौरभाला ।
विनायाचना देती अवघ्या जगाला ।।
परार्थाय तूं हि मनस्वी जळावे ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।८।।
तरु वेली गायी नद्या मेघ भानू ।
अशांच्या जिण्याला शके कोण वानू ? ।।
अशांच्या जिण्याला उराशीं धरावें ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।९।।
तुझे भानूचे आणि वैश्वान्नराचे ।
अति आर्त नाते असे अंतरीचे ।।
अशा तूं कसे चित्तीं उद्विग्न व्हावे ? ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।१०।।
अति क्रूर आवर्त विझवू पहाती ।
कशी झुंझू मी तो अति सान ज्योती ? ।।
आशंकेस या चित्ती येऊ न द्यावे ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।११।।
किती काळ झुंझू अशी एकटी मी ?।
कशी तेवू मी या अवाढव्य व्योमी ? ।।
स्वतःला मनी दुर्बल कां करावे ?।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।१२।।
कधी रावणाच्या, कधी कौरवांच्या ।
रूपानें अविष्कार होई तमाचा ।।
तदा रामकृष्ण रूपे अवतरावें ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।१३।।
कधी मुस्लिमांच्या, कधी ख्रिश्चनांच्या ।
रूपाने अविष्कार होई तमाचा ।।
शिवाजी संभाजी रूपे अवतरावें ।
तमाला गिळोनि जगां उजळावें ।।१४।।